समांतर क्रांती / युवा दिन विशेष ‘गिव्ह मी हंड्रेड युथ, आय वील चेंज द व्होल वर्ल्ड इन टू हेव्हन’ हे वाक्य वाचलं की हमखास डोळ्यासमोर येतात ते स्वामी विवेकानंद.पोरसवदा वयात अपार बुध्दीमत्ता बाणवलेले स्वामी विवेकानंद याच देशात होऊन गेले का? असा प्रश्नही सध्याच्या वर्तमानात विचारवंताकडून विचारला जातो. त्याबरोबर देशाच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उभे केले जाते. तरूणांचा […]
चेतन लक्केबैलकर तिकडे छत्तिसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आठजण मृत्यूमुखी पडल्याची घडत असतांना आणि त्या घटनेतील मृतात पूर्वाश्रमीच्या पाच नक्षलींचा समावेश असल्याने खळबळ माजली असतांनाच इकडे कर्नाटकात मात्र सहा नक्षलींनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे या संपूर्ण मोहीमेत मराठी माणसाचे योगदान महत्वाचे ठरले आहे. कर्नाटक राज्याने गेल्या वर्षी स्थापन केलेल्या नक्षल आत्मसमर्पण आणि पुनर्वसन समितीने […]
समांतर क्रांती / प्रासंगिक खानापूर तालुका हा दाट जंगलाने व्यापलेला आहे. आवघ्या तालुक्यात वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. जेवढे वन्य प्राणी आहेत, कमी-अधिक तेवढे वन्यप्राणीदेखील आहेत. साहजिकच अनेकवेळा माणूस आणि वन्यप्राण्यातील संघर्ष हा पाचविला पुजला आहे. पण, स्वत:हून वन्य प्राण्यांचे संकट ओढवून घेणाऱ्यांची किव करावी, अशी सद्यस्थिती आहे. दिवसाढवळ्या जनवस्तीजवळ, रानवाटेवर मुक्त संचार करणाऱ्या हत्ती, वाघ, बिबटे, […]
वैशाली पाटील यांचे प्रतिपादन; नंदगड जेसीएस शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी खानापूर: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना नेहमीच स्त्रियांची स्थिती बदलायची होती. त्या भारताच्या पहिल्या शिक्षिका बनल्या. बालविवाहामुळे लहान वयातच मुली विधवा होत. बाल विधवांना मुंडन केले जात असे. लैंगिक शोषणही होत असे. सावित्रीबाईंनी त्यांच्यावर होत असलेल्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. रुढी-परंपराना विरोध करून अथक परिश्रम […]
चेतन लक्केबैलकर / स्पेशल रिपोर्ताज What is going on at that illegal resort? आमटे येथील एका विनापरवाना रिसॉर्टमधील जलतरण तलावात बुडाल्याने महांतेश अशोक गुंजीकर (वय २७, खासाबाग-बेळगाव) या तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२९) घडली. या घटनेनंतर तालुक्यातील अशा विनापरवाना अवैध रिसॉर्टचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा या रिसॉर्टमध्ये अनेक अवैध प्रकार चालत असल्याचे […]
कृती शब्दांपेक्षा मोठी असते; अशाप्रकारे ज्यांनी सर्वाधिक टीका सहन करून सर्वाधिक काम करून दाखवणारे नव्या भारताचे शिल्पकार म्हणजे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग.त्यांचे नुकताच निधन झाले. त्याबद्दल त्यांना वाहिलेली ही शब्द सुमनांजली..! ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलण्याइतपत आपण मजबूत आहोत, याचे कारण डॉ.मनमोहन सिंग. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीद्वारे गाव-खेड्यातील गोरगरिबांना १०० दिवसांचा रोजगार मिळवून देण्याच्या […]
समांतर क्रांती / साहित्य संमेलन विशेष तोंडाला पाणी लावून महाराष्ट्रीयन गेले इथल्यांनी सवतीचे सवतूर पोरं केले मलपुरीची कावेरी नक्कीच झाली असती विकासाची गंगा इथं हिरवं लेणं ल्याली असती इकडे आड, तिकडे विहीर मध्येच बसलंय आपलं पूर तरीही त्याच प्रतिक्षेत झक्क मारतंय खानापूर ! अनगडी येथील कवी संजीव वाटुपकर यांच्या खानापूर या कवितेतील ओळी खानापूरची चपखल […]
खानापूर तालुक्यात २५ वर्षात १५ जणांचा मृत्यू समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुक्यात दोन –अडिच दशकापासून हत्ती आणि माणसांतील संघर्ष जणू इरेला पेटला आहे. गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत एका खानापूर तालुक्यात हत्तींनी १५ जणांचा बळी घेतला आहे. दिवसे-दिवस जटील बनत चालेल्या हत्ती समस्येबाबत शासन-प्रशासनाने ‘गेंड्याचे कातडे’ पांघरलेले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दहा हत्तींनी […]
महिलांचा वाढलेला टक्का, कुणाला धक्का? विशेष रिपोर्ट / चेतन लक्केबैलकर पद्मश्री सुक्री गौडा यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदनाचा हक्क बजावता आला नाही. आधीच आजारपणामुळे त्या अत्यवस्थ आहेत, त्यात मतदानाचा हक्क बजावता न आल्याने त्या आणखी अस्वस्थ झाल्या आहेत. पद्मश्री या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानीत महिलेला मतदानाचा बहुमोल हक्क बजावता येत नाही, ही किती मोठी दुर्दैवी […]
गेल्या वेळी उत्तरा कन्नड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अनंतकुमार हेगडे जवळपास पाच लाख मतांनी विजयी झाले होते. आता निवडणुकीच्या रिंगणात अनंतकुमार हेगडे नाहीत आणि भाजपची मोदी लाटही नाही. मागच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कोणताही जनाधार नसलेल्या निधर्मी जनता दलाला हा मतदारसंघ सोडला होता आणि अनंतकुमार हेगड यांना विजय मिळवून दिला होता. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली […]