समांतर क्रांती / मान्सून स्पेशल समुद्र सपाटीपासून 649 मीटर म्हणजेच 2129 फुट उंचीवर असलेल्या खानापूर तालुक्यात मलप्रभा (कणकुंबी), म्हादई (देगाव), मार्कंडेय (बैलूर) , काळी नदी (डोंगरगाव), मंगोत्री (मोदेकोप), पांढरी नदी (कामतगा) या नद्यांचा उगम होतो. त्याशिवाय कळसा, भांडुरा, हलतर, बैलओहोळ, निट्टूर नाला, कुंभार ओहोळ, हालात्री, सुर्ल नाला यासह सुमारे डझनभर नाल्यांचा उगम तालुक्याच्या पश्चिम भागातून […]
समांतर क्रांती / विशेष अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचीवपदावर कार्य करणे साधेसुधे नाहीच. कारण, त्यासाठी अनेक राज्यांच्या समित्यांशी संबंध येतो, वेगवेगळ्या लोकांशी, विविध जाती – धर्माच्या लोकांशी, सर्वसामान्यांशी संबंध येतो. त्यासाठी प्रत्येक प्रदेशातील रुढी-परंपरा, तेथील संस्कृती समजून घेणे, प्रत्येक समाजात मिसळणे आगत्याचे ठरते. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून येथील माजी आमदार आणि अखिल भारतीय कमिटीच्या सचीव तसेच […]
समांतर क्रांती / खानापूर येथील चौराशीदेवी संगीत कला मंच आयोजित ‘विठ्ठल नाद’ संगीत भजन स्पर्धेत गोल्याळी येथील श्री रवळनाथ भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत तालुक्यातील १५ भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत जांबोटीच्या श्री रामकृष्ण भजनी मंडळाने दुसरा क्रमांक पटकाविला.तर दारोळी येथील शिवगणेश भजनी मंडळ, हब्बनहट्टीच्या स्वयंभू हनुमान भजनी मंडळ, कुपटगिरी येथील विठ्ठल […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर तालुक्यातील राखीव जंगलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या टोळक्याने पार्टी केल्याने वादाला तोंड फुटले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला असून आता व्हायरल होत आहे. एका आठवड्यापासून चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये सुमारे १२ ते १५ पोलिस कर्मचारी परवानगीशिवाय संवेदनशील वनक्षेत्रात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यांनी आग पेटवून अन्न शिजवले आणि मद्यपान […]
येळ्ळूरात २० वे मराठी साहित्य संमेलन उत्साहात येळ्ळूर: मातृभाषेला पर्याय नाही. त्यासाठी ती टिकविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. भाषेच्या प्रश्नासाठी लढत असतांना केवळ भावनेला महत्व देऊन चालणार नाही. मातृभाषा जगविण्याबरोबरच कृतीतून तिचे संवर्धन झाले पाहिजे. सीमाप्रश्नाला एका विशिष्ठ साच्यात बांधून न ठेवता, या प्रश्नाला वैश्विक विचारांची जोड द्यायला ही, असे प्रतिपादन डॉ. शरद बाविस्कर यांनी केले. […]
समांतर क्रांती / विशेष भीमगड अभयारण्यातील गावांना शासकीय सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने १३ गावांच्या स्थलांतरासाठी कंबर कसली आहे. या गावांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना तेथील वन्यजीवन धोक्यात येणार असल्याची मखलाशी वनखात्याकडून केली जात आहे. दुसरीकडे वनखात्याने पर्यटकांसाठी जंगल सफारीची योजना आखली आहे. त्यामुळे वन्यजीव धोक्यात येणार नाहीत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकताच […]
माचीगड / दिवंगत अजित सगरे साहित्य नगरी समाजात कुणीच सुखी नाही. पैशामुळे माणूस अद्पदीत होतो. १३ व्या शतकात समाज असाच अद्पदीत झाला होता. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीत चार योग आहेत, त्यातील तीन अत्यंत कठीण आहेत. मात्र, भक्तीयोगामुळे माणूस निर्भय बनतो आणि निर्भयतेतच खरा आनंद असतो. निर्भयता आणि निरागसता आहे तेथे देव आहे, असे […]
माचीगड / दिवंगत अजित सगरे साहित्यनगरी गावाचं गावपण टिकविण्यासाठी आज साहित्य संमेलनांची गरज आहे. शहरातील संमेलनांना अनेक कंगोरे असतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी भाषेचे महत्व जाणले. त्यांनी माणूस मांडला. तुकारामांनी त्यांच्या अभंगातून प्राणी, पक्षी, वनस्पती आणि निसर्गाचा व्यवहार मांडला. मातृभाषा ही जीवनाचा महामार्ग आहे. ती कुणाचीही मक्तेदारी नाही. भाषा कुणालाही शिकता येते. भाषा माणूस […]
समांतर क्रांती / साहित्य संमेलन विशेष तोंडाला पाणी लावून महाराष्ट्रीयन गेले इथल्यांनी सवतीचे सवतूर पोरं केले मलपुरीची कावेरी नक्कीच झाली असती विकासाची गंगा इथं हिरवं लेणं ल्याली असती इकडे आड, तिकडे विहीर मध्येच बसलंय आपलं पूर तरीही त्याच प्रतिक्षेत झक्क मारतंय खानापूर ! अनगडी येथील कवी संजीव वाटुपकर यांच्या खानापूर या कवितेतील ओळी खानापूरची चपखल […]
समांतर क्रांती / नंदगड माचीगड-अनगडी येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीच्या २८ व्या साहित्य संमेलनाचे आयोजन उद्या रविवारी (ता.२९) करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे साहित्यिक डॉ. बी.एम.हर्डिकर असून ते पहिल्या सत्रात अभिभाषण देतील. स्वागताध्यक्ष वास्तूवशारद पिटर डिसोझा हे उपस्थितांचे स्वागत करतील. गेल्या २८ वर्षांपासून माचीगड येथे साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक साहित्यिकांनी […]