समांतर क्रांती ब्युरो Devendra Fadnavis is the 21st Chief Minister; Who has held the post of Chief Minister of Maharashtra? महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी (५ डिसेंबर) शपतबध्द झाले. यापूर्वी त्यांनी राज्याचे आठरावे मुख्यमंत्री म्हणून ५ वर्षे १२ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यानंतर औटघटकेचे आणि पहाटेचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर नोंद आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर जून महिन्यापासून विज्ञान शिक्षक नाही, त्यामुळे या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. जवळपास मार्च-एप्रिलदरम्यान परिक्षा होणार आहेत. असे असतांना तात्काळ शिक्षकाची नियुक्ती करण्याऐवजी ३१ मार्चपर्यंत शिक्षक देऊ असे आश्वासन येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी देत जणू अकलेचे तारे तोडले आहेत. विशेष म्हणजे शिरोली येथील आंदोलनकर्त्यांनीदेखील त्यांच्या या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले आहे. परिणामी, आंदोलन […]
उन्हाळी भात, फळझाडांचे नुकसान; आमदारांकडून नुकसानीची पाहणी पश्चिम भाग आणि भीमगड अभयारण्यात मलप्रभा आणि म्हादई या बारमाही वाहणाऱ्या नद्यांसह डझनभर नाले आहेत. यंदा सर्वच भागातील नदी-नाल्यांची पात्रात ठणठणाट असला तरी या भागातील नदी- नाल्यांत मुबलक पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे यामुळेच या भागात उन्हाळी भात आणि मिरचीचे पीक घेतले जाते. शिवाय या भागात मोठ्या प्रमाणात केळी, […]
बेळगाव: आरोग्य क्षेत्रात पारिचारीकांची प्रमुख भूमिका असते. त्यांचे कार्य मोलाचे असते. त्यामुळेच या क्षेत्रातील कामकाज सोयीचे होते, असे मत डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले. त्या अरिहंत हॉस्पिटलमध्ये आंतराष्ट्रीय नर्स (पारिचारीका) दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर मिनाक्षीताई रावसाहेब पाटील, डॉ. महादेव दिक्षीत आणि डॉ. माधुरी दिक्षीत उपस्थित होत्या. प्रसंगी आंतरराष्ट्रीय […]
खानापूर : सीमा भागातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात मोफत आणि सवलतीत प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबत मंगळवारी (ता. १४ ) खानापूर येथील शिवस्मारक येथे सकाळी साडे दहा वाजता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा खानापूर तालुक्यासह सीमा भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.शिवाजी विद्यापीठतर्फे सिमाभागातील […]
खानापूर: शहर परिसरासह तालुक्याच्या ग्रामिण भागात तब्बल तासभर पावसाने हजेरी लावली. कांही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता, पण पुन्हा उष्णता वाढली. दुसऱ्यांदा आज शनिवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. गतवर्षी पावसाने हात दिला होता. त्यामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांत मुबलक पाणी साठा होऊ शकला नव्हता. सध्या सर्वच नदी-नाल्यात ठणठणाट आहे. अंतरजल पातळीतदेखील कमालाची घट […]
खानापूर: मणतुर्गे येथील रवळनाथ मंदिराचा कॉलम भरणी समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास पाटील व सौ. भाग्यश्री विलास पाटील होते. प्रारंभी रवळनाथाचे पुजन गावचे पुजारी विष्णू गुंडू गुरव आणि सौ. लक्ष्मी विष्णू गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन ज्येष्ठ नागरिक नारायण गुंडपीकर, वासुदेव पाटील, विठोबा देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य विशाल अशोकराव […]
समांतर क्रांती विशेष कधीकाळी प्रो-काँग्रेस असलेल्या खानापूरच्या म.ए.समितीचे २००८ नंतरच्या सुमारास प्रो-भाजप असे रुपांतर झाले. समितीची शकले होत असलेला हा काळ. साहजिकच मराठी भाषीक तरूणच नाही, तर नेतेसुध्दा भाजपच्या वळचणीला बांधले गेले. समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच उत्तर कन्नड लोकसभेची निवडणूक लढविली जात आहे. अशावेळी समितीचा उमेदवार विजयी होणार का? याहून समितीचा उमेदवार कुणाची मते खाणार? याबाबत […]
मणतुर्गा येथील सभेत ईश्वर बोबाटे गरजले; ॲड, घाडी, बिर्जे आणि मुतगेकरांनी डागली तोफ खानापूर: गेल्या तीस वर्षांपासून भाजप तालुक्यातील लोकांना नागवीत आहे, आता खूप झालं. त्यामुळेच आम्ही काँग्रेसच्या सोबत समर्थपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. यावेळी आपल्या तालुक्यातील उमेदवार असलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांनाच विजयी करायचं हे ठरलंय, जनतेनेदेखील डॉ. बनंबाळकर यांनाच विजयी करण्यासा चंग […]
वेंकटेश हेगडे यांचा आरोप; शिरसी दुर्गम राहण्यास तेच कारणीभूत शिरसी: भाजपचे विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी शिक्षणमंत्री असतांना आठवीच्या विद्यार्थ्यांना सायकल वितरण करण्याच्या योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रधान सचीव वेंकटेश हेगडे- होसबाळे यांनी केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष जगदीश गौडा, महिला अध्यक्षा गिता शेट्टी, जिल्हा माध्यम संयोजिका ज्योती पाटील, दीपक हेगडे-दोड्डूर, […]