समांतर क्रांती / विशेष भीमगड अभयारण्यातील गावांना शासकीय सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने १३ गावांच्या स्थलांतरासाठी कंबर कसली आहे. या गावांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना तेथील वन्यजीवन धोक्यात येणार असल्याची मखलाशी वनखात्याकडून केली जात आहे. दुसरीकडे वनखात्याने पर्यटकांसाठी जंगल सफारीची योजना आखली आहे. त्यामुळे वन्यजीव धोक्यात येणार नाहीत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकताच […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील पहिली पतसंस्था जांबोटी बहुउद्देशीय सहकारी पतसंस्थेच्या खानापूर शाखेचा रौप्य महोत्सव बुधवार दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ११.०० वा. होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासराव कृष्णाजी बेळगांवकर (संस्थापक अध्यक्ष) राहणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिपप्रज्वलन महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आमदार विठ्ठल सो. हलगेकर, श्री पिसेदेव […]
समांतर क्रांती / जांबोटी खानापूर तालुक्यातील कणकुंबीजवळील रिसॉर्टमधील जलतरण तलावात बुडून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी (ता.२९) सायंकाळी घडली. या घटनेतील मृत महांतेश गुंजीकर (वय २७, रा.खासबाग-बेळगाव) हा बेळगाव येथील एका कंपनीचा कर्मचारी होता. याबाबतची अधिक माहिती अशी, मृत महांतेश हा त्याच्या कंपनीतील अन्य २२ कर्मचाऱ्यांसह पार्टीसाठी कणकुंबीजवळील रिसॉर्टमध्ये आला होता. सायंकाळी जलतरण तलावात […]
माचीगड / दिवंगत अजित सगरे साहित्य नगरी समाजात कुणीच सुखी नाही. पैशामुळे माणूस अद्पदीत होतो. १३ व्या शतकात समाज असाच अद्पदीत झाला होता. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीत चार योग आहेत, त्यातील तीन अत्यंत कठीण आहेत. मात्र, भक्तीयोगामुळे माणूस निर्भय बनतो आणि निर्भयतेतच खरा आनंद असतो. निर्भयता आणि निरागसता आहे तेथे देव आहे, असे […]
माचीगड / दिवंगत अजित सगरे साहित्यनगरी गावाचं गावपण टिकविण्यासाठी आज साहित्य संमेलनांची गरज आहे. शहरातील संमेलनांना अनेक कंगोरे असतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी भाषेचे महत्व जाणले. त्यांनी माणूस मांडला. तुकारामांनी त्यांच्या अभंगातून प्राणी, पक्षी, वनस्पती आणि निसर्गाचा व्यवहार मांडला. मातृभाषा ही जीवनाचा महामार्ग आहे. ती कुणाचीही मक्तेदारी नाही. भाषा कुणालाही शिकता येते. भाषा माणूस […]
समांतर क्रांती / साहित्य संमेलन विशेष तोंडाला पाणी लावून महाराष्ट्रीयन गेले इथल्यांनी सवतीचे सवतूर पोरं केले मलपुरीची कावेरी नक्कीच झाली असती विकासाची गंगा इथं हिरवं लेणं ल्याली असती इकडे आड, तिकडे विहीर मध्येच बसलंय आपलं पूर तरीही त्याच प्रतिक्षेत झक्क मारतंय खानापूर ! अनगडी येथील कवी संजीव वाटुपकर यांच्या खानापूर या कवितेतील ओळी खानापूरची चपखल […]
समांतर क्रांती / खानापूरशिवारात हैदोस घातलेल्या हत्तीनी थेट सावरगाळी गावाच्या वेशीपर्यंत मजल मारली आहे. हत्ती मुक्तसंचार करीत असल्याने ग्रामस्थात दहशत पसरली आहे. हत्ती चवताळले असून एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी हत्तीना हुसकावून लावण्याची मागणी होत आहे. गेला आठवडाभर चार हत्तीचा कळप सावरगाळी परिसरात शिवारात तळ ठोकून आहे. आठवड्यात दोन वेळा हत्तीनी ज्ञानेश्वर जायप्पा पाटील यांच्या ऊसाचे तसेच […]
समांतर क्रांती / खानापूर पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्याची मागणी मंजुनाथ नाईक समर्थकांनी केली आहे. यासंदर्भात आज गुरुवारी (ता. 26) तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात, पोलिस निरीक्षक नाईक हे प्रामाणिक अधिकारी आहेत.भाजपचे आमदार सी. टी. रवी यांना अटक करून खानापूरात आणले होते. त्यावेळी नाईक यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात […]
समांतर क्रांती / खानापूर येथील पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबीत करण्यात येत असल्याचा आदेश उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकासकुमार विकास यांनी बजावला आहे. सी.टी.रवी प्रकरणात केलेली हयगय मंजुनाथ नाईक यांना भोवली आहे. गुरूवारी (ता.१९) रोजी हिरेबागेवाडी येथून भाजपचे आमदार सी.टी.रवी यांना खानापूरले आणले होते. तत्पूर्वी, खानापूर पोलिस स्थानकात आवश्यक बंदोबस्त ठेवण्याची सूचना पोलिस निरीक्षक […]
समांतर क्रांती / खानापूर माचीगड-अनगडी येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीचे २८ वे साहित्य संमेलन रविवारी (ता.२९) होणार आहे. कोल्हापूरचे साहित्यिक डॉ.बी.एम.हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. चार सत्रात हे संमेलन होणार असून चारही सत्राना महाराषष्ट्रातील नामवंत साहित्यिक हजेरी लावणार आहेत. सुब्रम्हण्य साहित्य अकादमी गेल्या २८ वर्षांपासून संमेलन आयोजनाच्या माध्यमातून साहित्यसेवा करीत आहे. यंदाच्या संमेलनात डॉ.बी.एम. […]