कारण राजकारण / चेतन लक्केबैलकर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना कोण टक्कर देणार? हा प्रश्न सध्या बेळगाव ग्रामीण मतदार संघातील चर्चेचा विषय आहे. यावेळीही भाजप या मतदार संघात गारद होणार हे निश्चित असल्याने आता तमाम मराठीप्रेमी आणि हिंदूनिष्ठांची भिस्त म.ए.समितीवर आहे. समितीकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबतची चर्चा आता गावागावात रंगू लागली असून नव्या चेहऱ्याला संधी […]
सहकार / चेतन लक्केबैलकर कांही माणसं अतिमहत्वाकांक्षी असतात. त्यांना त्यांचे ध्येय गाठल्याशिवाय चैन पडत नसते. त्यासाठी ती एखाद्या मढ्याच्या छाताडावर पाय ठेवून सोपान चढायलाही मागे पुढे पाहत नाहीत. तर कांही जणांची महत्वाकांक्षा आभाळाला भिडण्याची जरी असली तरी त्यांची चिमणी होऊन दाणे टिपण्याचीही कुवत नसते. या मधल्या पोकळीत जी माणसं असतात, ती खऱ्या अर्थाने यशाचे शिखर […]
चेतन लक्केबैलकर आश्वासनांची खैरात करून जनसामान्यांना गुंतवून ठेवण्याचा चंग बांधून आगामी निवडणुकीत इस्पित साध्य करून घेण्याचा ध्यास तालुक्यातील इच्छूक उमेदवारांनी घेतला आहे. त्यात म.ए.समितीचे नेते, काँग्रेसच्या सर्वेसर्वा आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि तालुक्याच्या विकासाचा महामेरू पेलत असल्याचा अभास निर्माण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांसह ‘भायल्यां’चाही समावेश आहे. मात्र, त्यांच्या या आश्वासनांमुळे सर्वसामान्यांचे जीव कवडीमोल झाले आहेत. तालुक्यातील […]
खानापूर: दोन गटात विभागलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी साधण्यात मध्यवर्ती म.ए.समितीच्या नेत्यांना अखेर यश आले आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि आगामी विधानसभा निवणुकीत मराठी भाषिकांची लोकेच्छा प्रदर्शित करण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र येण्याच्या केलेल्या आव्हानाला तालुक्यातील मराठी भाषिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. येथील शिवस्मारकात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत आठ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. एकंदर,एकीची प्रक्रिया विनासायास सुरू […]
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बेळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चोरीचे लोण ग्रामिण भागात पोहचल्यामुळे ही अधिक चिंतेची बाब बनली आहे. भात कापणी, ऊसतोड हंगामामुळे गावांमध्ये असणाऱ्या शुकशुकाटाचा फायदा उठवित चोरटे दिवसाढवळ्या हात साफ करून घेत आहेत. बेळगाव ग्रामिण आणि खानापूर तालुक्यातील चोरीचे प्रमाण अधिक असून या बहुतेक चोऱ्या ‘धाडसी चोरी’ या […]
खानापूर: गोपाळ देसाई यांच्या गटाने वाकडी वाट करीत बुडाखाली शेपूट घातल्यामुळे एकीचा प्रयत्न पुन्हा बारगळला. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या गटातील नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवित गोपाळ देसाई गटाच्या आंदोलनस्थळी जाऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गर्लगुंजी येथील माऊली ग्रूपने महत्वाची भूमिका बजावली. पण, त्यांच्याही आपेक्षांवर विरजन पडले. किमान काळ्यादिनी तरी दोन्ही समित्या एकीची संधी साधतील, […]
जय महाराष्ट्र! बोला की, काय चाललंय? हा संवाद कोल्हापूर, मुंबई किंवा पुण्यातला नाही. सीमाभागातील तरूणसुध्दा संभाषणाची सुरूवात ‘जय महाराष्ट्र’ने करतात. मराठी आपली मायबोली आहे, तीच्यासाठी गेल्या ६६ वर्षांपासून आपले बापजादे खपत आले आहेत,याची जाणिव उशिरा का होईना सीमाभागातील तरूणांना होत आहे. इतकंच काय एरव्ही हॉटेलमध्ये चहाचे घोट रिचवितांना टवाळकी करणारे तरूणही सीमाप्रश्नावर भरभरून बोलतांना दिसताहेत. […]