खानापूर: घर बांधून झाले तरी ग्रा.पं.कडून निधी मिळाला नाही, त्यामुळे शेजारी आणि सावकारांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड करता न आल्याने महिलेने शिवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अशोकनगर येथे घडली. दोडव्वा चंद्राप्पा दोडमनी (वय ४५) असे या महिलेचे नाव असून तिच्या पश्चात विवाहीत मुलगा आणि मुलगी असल्याचे समजते.
अशोकनगर येथील चंद्रव्वा यांचा मुलगा गवंडी कामानिमित्त बाहेरगावी असतो. ग्राम पमचायतीकडून त्यांना घर ममजूर झाले होते. घर बांधून पूर्ण झाले तरी पंचायतीकडून निधी मिळाला नाही. त्यामुळे कधीतरी निधी मिळेल, या आशेवर त्यांनी शेजारी आणि सावकाराकडून उसनवारी करून कर्ज घेतले होते. देणेकऱ्यांनी पैशासाठी तगादा लावल्यामुळे चंद्रव्वा यांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरूवारी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. खानापूर पोलिसात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

चोर्ला घाटात दोन कारचा अपघात
कणकुंबी: चोर्ला घाटात दोन कारची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात चालकासह दोघेजण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त दोन्ही कारच्या दर्शनी भागाचा चाक्काचूर झाला असून केवळ सुदैवाने या अपघातात जिवितहानी टळली. गोव्याहून कणकुंबीच्या दिशेने येणाऱ्या कारला कणकुंबीहून गोव्याकडे जाणाऱ्या कारने चोर्ला घाटातील वळणावर समोरासमोर जोराची धडक दिली. यावेळी एका कारमधील चालकासह अन्य एकजण जखमी झाला. त्यांना तात्काळ […]