समांतर क्रांती / नंदगड
सीमावासियावर कर्नाटक सरकारने चालविलेल्या अन्यायाने कळस गाठला आहे. गेल्या 68 वर्षांपासून आपण न्याय्य हक्कासाठी लढत आहोत. आपला लढा न्याय मिळेपर्यंत निरंतर सुरु राहील. अन्यायाला आंदोलनाने उत्तर द्यावे लागेल, त्यासाठी मराठी भाषिकांनी काळ्यादिनी आपले व्यवहार बंद ठेऊन सरकारचा निषेध नोंदवावा, असे आवाहन आज नंदगड येथील जागृती फेरीदरम्यान खानापूर म. ए. समितीने केले.
आज बुधवारी (ता. 29) नंदगड बाजारपेठ आणि गावात जनजागृती करण्यात आले. यावेळी समिती नेते आणि कार्यकर्त्यांनी पत्रके वाटून खानापूर येथील एक दिवशीय धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, प्रविण पाटील, मोहन गुरव, ब्रम्हानंद पाटील, रुकमान्ना झुंजवाडकर, राजाराम देसाई, डी. एम. भोसले, विठ्ठल गुरव, ज्ञानेश्वर गुरव आणि ज्ञानेश्वर बिडकर उपस्थित होते.

शिंदोळी ग्राम पंचायत विकास निधी गैरव्यवहार
समांतर क्रांती / खानापूर शिंदोळी ग्राम पंचायतीच्या ग्राम विकास निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी सदस्य विठ्ठल कौंदलकर यांनी केला आहे. तसे निवेदन सुद्धा त्यांनी पंचायत विकास अधिकाऱ्यांना सादर केले आहे. पंचायतीतून मंजूर होणारी विकास काम अध्यक्षांचे पती स्वतःच करीत असून केवळ एका कामगारवर ही कामे केली जात आहेत. परिणामी, एकतर काम वेळेत पूर्ण होत नाही, […]