बेंगळुरू: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने (जेएसी) ३१ डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी भेट घेऊन २००० कोटी रुपयांची मागणी केली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी निधीची तरतूद करण्यास सहमती दर्शविल्यानंतर संयुक्त कृती समितीने संपचा निर्णय मागे घेतला आहे. बस सुरू राहणार आहेत. एआयटीयूसीशी […]
समांतर क्रांती / जांबोटी खानापूर तालुक्यातील कणकुंबीजवळील रिसॉर्टमधील जलतरण तलावात बुडून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी (ता.२९) सायंकाळी घडली. या घटनेतील मृत महांतेश गुंजीकर (वय २७, रा.खासबाग-बेळगाव) हा बेळगाव येथील एका कंपनीचा कर्मचारी होता. याबाबतची अधिक माहिती अशी, मृत महांतेश हा त्याच्या कंपनीतील अन्य २२ कर्मचाऱ्यांसह पार्टीसाठी कणकुंबीजवळील रिसॉर्टमध्ये आला होता. सायंकाळी जलतरण तलावात […]
माचीगड / दिवंगत अजित सगरे साहित्य नगरी समाजात कुणीच सुखी नाही. पैशामुळे माणूस अद्पदीत होतो. १३ व्या शतकात समाज असाच अद्पदीत झाला होता. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीत चार योग आहेत, त्यातील तीन अत्यंत कठीण आहेत. मात्र, भक्तीयोगामुळे माणूस निर्भय बनतो आणि निर्भयतेतच खरा आनंद असतो. निर्भयता आणि निरागसता आहे तेथे देव आहे, असे […]
माचीगड / दिवंगत अजित सगरे साहित्यनगरी गावाचं गावपण टिकविण्यासाठी आज साहित्य संमेलनांची गरज आहे. शहरातील संमेलनांना अनेक कंगोरे असतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी भाषेचे महत्व जाणले. त्यांनी माणूस मांडला. तुकारामांनी त्यांच्या अभंगातून प्राणी, पक्षी, वनस्पती आणि निसर्गाचा व्यवहार मांडला. मातृभाषा ही जीवनाचा महामार्ग आहे. ती कुणाचीही मक्तेदारी नाही. भाषा कुणालाही शिकता येते. भाषा माणूस […]
समांतर क्रांती / साहित्य संमेलन विशेष तोंडाला पाणी लावून महाराष्ट्रीयन गेले इथल्यांनी सवतीचे सवतूर पोरं केले मलपुरीची कावेरी नक्कीच झाली असती विकासाची गंगा इथं हिरवं लेणं ल्याली असती इकडे आड, तिकडे विहीर मध्येच बसलंय आपलं पूर तरीही त्याच प्रतिक्षेत झक्क मारतंय खानापूर ! अनगडी येथील कवी संजीव वाटुपकर यांच्या खानापूर या कवितेतील ओळी खानापूरची चपखल […]
समांतर क्रांती / नंदगड माचीगड-अनगडी येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीच्या २८ व्या साहित्य संमेलनाचे आयोजन उद्या रविवारी (ता.२९) करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे साहित्यिक डॉ. बी.एम.हर्डिकर असून ते पहिल्या सत्रात अभिभाषण देतील. स्वागताध्यक्ष वास्तूवशारद पिटर डिसोझा हे उपस्थितांचे स्वागत करतील. गेल्या २८ वर्षांपासून माचीगड येथे साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक साहित्यिकांनी […]
समांतर क्रांती / खानापूर येथील भूविकास बँकेच्या आज शनिवारी (ता.२८) झालेल्या निवडणुकीत गर्लगुंजीतून विद्यमान संचालक विरुपाक्षी पाटील (बरगाव) यांचा एकतर्फी विजय झाला. तर कक्केरी मतदार संघात प्रकाश आंग्रोळी आणि निळकंठ गुंजीकर यांच्यात काँटे की टक्कर झाली. दोघांनाही समसमान १२ मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली, त्यात निळकंठ गुंजीकर यांना संचालकपदाची लॉटरी लागली. बँकेच्या १५ पैकी […]
वृत्तविश्लेषण / चेतन लक्केबैलकर गेल्या आठवडाभरापासून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ज्या कांही मर्कटलिला चालविल्या आहेत, त्याला काय म्हणावे? असा प्रश्न सुज्ञ नागरीकांस पडला आहे. भाजप आमदार सी.टी.रवी यांच्या ‘त्या’ अश्लिल वक्तव्यानंतर सुरू झालेल्या रणकंदनात राज्यातील भाजपची एक तर खानापूरच्या भाजप नेत्यांची दुसरीच भूमिकाआहे. ती उमगण्याच्या पलिकडची असून यामुळे भाजपच्या नेत्यांनी स्वत:चेच हसू करून घेतले. त्याची जाणीव […]
समांतर क्रांती / खानापूरशिवारात हैदोस घातलेल्या हत्तीनी थेट सावरगाळी गावाच्या वेशीपर्यंत मजल मारली आहे. हत्ती मुक्तसंचार करीत असल्याने ग्रामस्थात दहशत पसरली आहे. हत्ती चवताळले असून एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी हत्तीना हुसकावून लावण्याची मागणी होत आहे. गेला आठवडाभर चार हत्तीचा कळप सावरगाळी परिसरात शिवारात तळ ठोकून आहे. आठवड्यात दोन वेळा हत्तीनी ज्ञानेश्वर जायप्पा पाटील यांच्या ऊसाचे तसेच […]
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधनदिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. एम्स रुग्णालयात वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना सायंकाळी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर प्रारंभी घरीच उपचार करण्यात आले पण त्याचा उपयोग ना झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री […]