गावगोंधळ / सदा टीकेकर सर्रास सरकारी अधिकारी आणि कर्मचारी स्थानिक आमदारांच्या ताटाखालची मांजरं असतात, असा अस्मादिकांचा अनुभव. त्यांच्यात दलाली कोण करीत असतील ते ‘सरकारी’ ठेकेदार. विशेषत: विकास कामांचे ठेके अशाच ठेकेदारांनाच मिळत असतात. आमदारांची आणि सर्वच लोकप्रतिनिधींची अशा ठेकेदारांवर खप्पामर्जी असते. त्याचा गैरफायदा (मुदलात तो फायदाच असतो. कारण आमदार आणि अधिकारी यांच्यातील दलालीत एवढे तरी […]
संडे स्पेशल / चेतन लक्केबैलकर बॅनरनी खानापूर शहराचेच नव्हे तर तालुक्यातील अनेक गावांचे सौंदर्य झाकोळून गेले आहे. तालक्यातील नेत्यांनी त्यांचे बॅनर झळकावून स्वत:चे ‘मोठे’पण झळकावण्याची जणू स्पर्धाच भरविली आहे. ज्याचे जेवढे मोठे बॅनर तेवढी प्रसिध्दी अधिक असे समिकरण बनत चालले आहे. पण, रामगुरवाडी गावाच्या वेशीवर लागलेल्या एका बॅनरने या सगळ्याच लोकप्रतिनिधी आणि नेत्यांची लाज काढली […]
जोयडा: रामनगर हनुमान गल्ली येथील प्राथमिक हिरीय सरकारी शाळेत माध्यन आहार बनविणाऱ्या महिला बेजबाबदारपणे काम करीत होत्या, त्यांच्यामध्ये वारंवार होणारे वाद यामुळे मुलांना योग्य दर्जाचे अन्न मिळत नव्हते, मुलांसाठी असलेल्या अन्न धान्याचा दुरपयोग होत होता, त्यामुळे शाळेत जेवण बनविणाऱ्या तिन्ही महिलांना कामावरून काढले आहे, यामध्ये कोणालाही जातीवरून त्रास दिला नाही, अशी माहिती शाळा विकास आणि […]
जोयडा: आगामी विधानसभा निवडणुक कोणत्या पक्षातून लढविणार, यासंदर्भात माजी विधान परिषद सदस्य एस एल घोटणेकर यांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रामनगर येथे केली. त्यात निवडणूक लढविण्यास आपण सज्ज असून या महिन्यात योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगत एस एल घोटणेकर कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.एस एल घोटणेकर यांनी रामनगर येथील […]
सुपा विस्थापितांच्या जमिनी 40 वर्षे पाण्याविना काळी नदीच्या पाण्याला उत्तर कर्नाटकाची वाट? बम्मू फोंडे/जोयडा पाण्याने समृद्ध असलेल्या शेत जमिनिंचा सुपा धरणासाठी त्याग केलेल्या विस्थापिताना रामनगर येथे जमिनी दिल्या आहेत , पण त्या जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी गेल्या 40 वर्षात पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. त्यामुळे सुपा धरणाच्या पाण्यावर होणाऱ्या वीजनिर्मितीतून राज्याला उजेड देणाऱ्या रामनगर वासियांच्या […]
सहकार / चेतन लक्केबैलकर कांही माणसं अतिमहत्वाकांक्षी असतात. त्यांना त्यांचे ध्येय गाठल्याशिवाय चैन पडत नसते. त्यासाठी ती एखाद्या मढ्याच्या छाताडावर पाय ठेवून सोपान चढायलाही मागे पुढे पाहत नाहीत. तर कांही जणांची महत्वाकांक्षा आभाळाला भिडण्याची जरी असली तरी त्यांची चिमणी होऊन दाणे टिपण्याचीही कुवत नसते. या मधल्या पोकळीत जी माणसं असतात, ती खऱ्या अर्थाने यशाचे शिखर […]
चेतन लक्केबैलकर आश्वासनांची खैरात करून जनसामान्यांना गुंतवून ठेवण्याचा चंग बांधून आगामी निवडणुकीत इस्पित साध्य करून घेण्याचा ध्यास तालुक्यातील इच्छूक उमेदवारांनी घेतला आहे. त्यात म.ए.समितीचे नेते, काँग्रेसच्या सर्वेसर्वा आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि तालुक्याच्या विकासाचा महामेरू पेलत असल्याचा अभास निर्माण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांसह ‘भायल्यां’चाही समावेश आहे. मात्र, त्यांच्या या आश्वासनांमुळे सर्वसामान्यांचे जीव कवडीमोल झाले आहेत. तालुक्यातील […]
चेतन लक्केबैलकर शाळेत वर्गातील फळ्याच्या अगदी मधोमध लिहिलेला ‘मिठाशिवाय चव नाही, आईशिवाय माया नाही.’ हा सुविचार आणि सांबर-डाळ आळणी किंवा खारट झाल्यास येणारा संबंध वगळता मिठाशी अस्मादिकांस कांही देणं-घेणं नाही. हिंदी सिनेमातल्या ‘नमकहराम, मै तुझे जिंदा नही छोडुंगा’चा डॉयलॉग सोडला तर दररोजच्या उदरभरणात मिठाला अणण्यसाधारण महत्व असुनही त्याच्याशी उपरोक्त नोंद केल्याप्रमाणे क्वचीतच आम्ही मिठास जागतो.(अर्थातच! […]
खानापूर: दोन गटात विभागलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी साधण्यात मध्यवर्ती म.ए.समितीच्या नेत्यांना अखेर यश आले आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि आगामी विधानसभा निवणुकीत मराठी भाषिकांची लोकेच्छा प्रदर्शित करण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र येण्याच्या केलेल्या आव्हानाला तालुक्यातील मराठी भाषिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. येथील शिवस्मारकात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत आठ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. एकंदर,एकीची प्रक्रिया विनासायास सुरू […]
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बेळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चोरीचे लोण ग्रामिण भागात पोहचल्यामुळे ही अधिक चिंतेची बाब बनली आहे. भात कापणी, ऊसतोड हंगामामुळे गावांमध्ये असणाऱ्या शुकशुकाटाचा फायदा उठवित चोरटे दिवसाढवळ्या हात साफ करून घेत आहेत. बेळगाव ग्रामिण आणि खानापूर तालुक्यातील चोरीचे प्रमाण अधिक असून या बहुतेक चोऱ्या ‘धाडसी चोरी’ या […]