मोठ्या पगाराची नोकरी किंवा बेफाम पैसा मिळवून देणारा व्यवसाय, चारचाकी गाडी आणि टोलेजंग बंगला, सुदरशी पत्नी आणि एखादे मुलं, ही आजच्या तरूणांची सर्वसामान्य स्वप्नं आहेत. त्याच्या पलिकडे जाऊन आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी निस्वार्थपणे कार्य करण्याची संवेदनशीलता आजचा तरूण हरवत चालला आहे. केवळ चार भिंतीतलं विश्व आजच्या तरूणांना खुणावत असतांना एखादा तरूण स्वयंप्रेरणेने समाजाच्या भल्याचा विचार […]
नंदगड: डोकीत वार करून वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना खानापूर तालुक्यातील भूत्तेवाडी येथे उघडकीस आली आहे. लक्ष्मण यल्लप्पा सुतार (७५) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव असून खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नंदगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कणकुंबी: चोर्ला घाटात दोन कारची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात चालकासह दोघेजण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त दोन्ही कारच्या दर्शनी भागाचा चाक्काचूर झाला असून केवळ सुदैवाने या अपघातात जिवितहानी टळली. गोव्याहून कणकुंबीच्या दिशेने येणाऱ्या कारला कणकुंबीहून गोव्याकडे जाणाऱ्या कारने चोर्ला घाटातील वळणावर समोरासमोर जोराची धडक दिली. यावेळी एका कारमधील चालकासह अन्य एकजण जखमी झाला. त्यांना तात्काळ […]
खानापूर: घर बांधून झाले तरी ग्रा.पं.कडून निधी मिळाला नाही, त्यामुळे शेजारी आणि सावकारांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड करता न आल्याने महिलेने शिवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अशोकनगर येथे घडली. दोडव्वा चंद्राप्पा दोडमनी (वय ४५) असे या महिलेचे नाव असून तिच्या पश्चात विवाहीत मुलगा आणि मुलगी असल्याचे समजते. अशोकनगर येथील चंद्रव्वा यांचा मुलगा गवंडी कामानिमित्त […]
समांतर क्रांती/विशेष रिपोर्ट सह्याद्रीच्या खुशीत घनदाट झाडीत लपलेले चिगुळे. सुर्यास्ताचे विलोभनीय दर्शन घडविणारे खानापूर तालुक्यातील लक्षवेधी ठिकाण. महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या हद्दीवर वसलेल्या या गावातील माऊली देवीमुळे तिन्ही राज्यांचे ॠणाणुबंध जुळले आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक, भाविक गावाला भेट देतात. तेथील निसर्गसौदर्य इतके विलोभनीय आहे की, प्रत्येकजण तेथील आठवणी सोबत घेऊनच जातो.चिगुळेचे तोंड भरून कौतुक न […]
समांतर क्रांती विशेष बेळगाव ते धारवाड लोहमार्गासाठी नंदिहळ्ळी परिसरातील शेकडो एकर जमिनी संपादीत करण्याचा घाट घातला गेला आहे. त्याला शेतकर्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. उच्च न्यायालयाने शेतकर्यांना दिलासा दिला होता. पण, मनाईहुकुम उठल्यानंतर जमिन संपादीत करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. एकीकडे शेतकर्यांचा विरोध आणि त्यासाठीची आंदोलने बळाचा वापर करून चिरडली जात […]
खानापूर: प्रियकराच्या छळाला कंटाळून तरूणीने विष प्राशन करून जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील निडगल येथे घडली. शनिवारी यासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारीनंतर सदर तरूणीच्या प्रियकरास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, मला सोडून इतर कुणाशी लग्न केल्यास एकत्र काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लग्न मोडणाऱ्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून निडगल येथील प्रियांका कल्लाप्पा कांबळे (22) […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकरओडिसात झालेल्या रेल्वे अपघातात जवळपास २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू तर ९०० हून अधिकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबद्दल देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. देशातील हा सर्वात मोठा आणि भयानक रेल्वे अपघात समजला जात असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर खानापूरजवळ झालेल्या रेल्वे अपघाताची आठवण ताजी झाली आहे. १९८० साली झालेल्या […]
नंदगड: बसची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील चार जण जखमी झाल्याची घटना दीडच्या सुमारास बिडीजवळ घडली. यामध्ये कर्तनबागेवाडी येथील भिमाप्पा व्हन्नुर, यल्लप्पा व्हन्नुर, पल्लवी व्हन्नुर, ऐश्वर्या व्हन्नुर हे जखमी झाले असून यातील दोघांची स्थिती चिंताजनक आहे. व्हन्नुर कुटुंबीय बिडीहून कर्तन बागेवाडीला जात असताना गोल्लीहळीजवळच्या वळणावर हल्याळहुन खानापूरकडे येणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसने दुचाकीला जोरदार धडक […]
महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक आणि इतर राज्यातील छत्रिय मराठा समाज विखुरला आहे. तो आजही एकसंघ नाही. विशेषत: कर्नाटकातील मराठा समाज विविध भागात आहे. त्यांची नाळ आजही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेशी जोडली गेली आहे. त्यांच्या संस्कृतीतून ती नेहमीच अधोरेखीत होत असते. कर्नाटकातील मराठा समाज एकवटला पाहिजे. तो एकवेळ अल्पसंख्य असला तरी चालेल, पण राज्यात मराठ्यांना सोयी-सुविधा मिळाल्या […]